नवीन ठाण्याला जोडण्यासाठी खाडीवर उभारला जाणार पूल; ठामपासमोर सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव

ठाणे (प्रतिनिधी): ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून केला जाणार आहे. भविष्यात, या ठिकाणी बिझनेस हब आणि परवडणारी घरे अशा संकल्पनेतून नवीन ठाण्याचा विकास करण्याचा ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए या दोन्ही प्राधिकरणांचा मानस आहे त्यातही घरापासन चालण्याच्या अंतरावर काम हीसद्धा संकल्पना आहे. त्यानुसार, तब्बल तीन हजार हेक्टर जमिनीवर नवीन ठाणे विकसित केले जाणार आहे. त्यासाठी कासारवडवली ते खारबाव असा ४०० मीटर लांबीचा उडाणपल खाडीवर उभारला जाणार आहे. त्याअनषंगाने या कामासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. घोडबंदरपासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर हे नवीन ठाणे विकासत हाणार आह. मागील काही वर्ष नवीन ठाण्याच्या विकासासाठी पावले उचलण्यात आली होती. परंतु, त्याचा मुहूर्त सापडत नव्हता. आता खऱ्या अर्थाने मागील वर्षापासून नवीन ठाण्याच्या विकासाला वेग आला आहे. त्यानुसार, खाडीपलीकडे असलेली खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावाचा विकास केला जाणार आहे. नवीन ठाण्याच्या विकासाच्या मागोतील एकेक अडथळा टप्याटण्याने दूर होत आहे. त्यानुसार, गायमुख ते खारबाव हा खाडीपूल तयार करण्याच्या हालचालींना खऱ्या अथान वग आला आहे. या पुलामुळे नवीन ठाणे अगदी ठाणे शहराजवळ येणार आहे. या पुलाचा सविस्तर अहवाल तयार र करण्यासंदर्भातील प्रस्ताव फेब्रुवारी २०१९ च्या महासभेत मंजूर झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या टण्यात दळणवळण व्यवस्थेवर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. एमएमआरडीए अलिबाग ते वसई-विरार असा मल्टिमोडल कॉरिडॉर उभारला जात असून तो नव्या ठाण्यातील खारबाव या गावातून जातो. हा कॉरिडॉर घोडबंदर रोड ते मोघरपाडा येथील ४० मीटर डीपी रस्त्याने जोडण्याची तरतूद एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आहे. त्यामुळे नवीन ठाणे अगदी जवळ येणार आहे. विशेष म्हणजे या नवीन ठाण्याच्या दिशेने मल्टिमोडल कॉरिडॉर जात असल्याने आजूबाजूचे सर्व नॅशनल हायवे जवळ येणार आहेत. ही एक या शहरासाठी मुख्य आणि सर्वात महत्त्वाची जमेची बाजू ठरणार आहे. या भागात तीन हजार हेक्टरवर नवीन ठाणे वसवले जाणार आहे. त्यामध्ये पायरयाले । रजार परवडणारी घरे निर्माण करण्याचा पालिकेचा मानस असणार आहे. त्यानुसार, नव्या शहराची लोकसंख्या समारे चार लाखांच्या घरात जाणार आहे. आलिशान घरे बांधली तर कमी लोकसंख्या येथे सामावली जाणार असन इतर सोयीसविधांवरसदा ताण येण्याची भीती आहे. त्यामळेपरवडणारी घरे बांधणे हाच महापालिकेचा मानस राहणार आहे. एमएमआरडीएने या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. त्यानसार १६ लोटीमोठी गोशटरोशनि केली जाणार आहेत.